
पंचनामा प्रतिनिधी – वटपौर्णिमेच्या पावन दिवशी सर्व मातांना, स्त्रियांना आणि सोज्वळ भारतीय नारीशक्तीला मानाचा मुजरा !!! पतीसाठी अखंड आयुष्याची प्रार्थना करणाऱ्या या सणामागे नुसती परंपरा नाही, तर त्यामागे आहे समर्पण, श्रद्धा आणि अढळ प्रेमाचं तेजस्वी रूप. वटवृक्षाप्रमाणे आपल्या संसाराचा पाया मजबूत असावा, हेच या सणाचं संदेश. या दिवसाच्या निमित्ताने नातेसंबंधांना नवसंजीवनी मिळो आणि निसर्गाशी आपलं नातं अजून घट्ट होवो.या दिवशी महिला पवित्र अशा वटवृक्षाला सात फेरे मारून जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना करतात. आजही ग्रामिण भागात वटपौर्णिमा हा सन धूमधडाक्यात साजरा केला जातो. वटपौणिमेच्या दिवशी महिलांनी एक सकल्प केला आहे.चला, एक नवीन वटवृक्ष लावू आणि त्याच्याशी आपल्या नात्याचं जिवंत नातं जपू.

निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे महिलांनी मोठ्या आनंदी वातावरणात ” वटपौर्णिमा ” साजरी केली.

