आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार तर एक गंभीर जखमी!

शिरदाळे परिसरात पिंजरा लावण्याची ग्रामपंचायतची मागणी!!

शिरदाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार तर एक गंभीर जखमी!

शिरदाळे परिसरात पिंजरा लावण्याची ग्रामपंचायतची मागणी!!

आज मध्यरात्री शिरदाळे येथील शेतकरी जगदीश रंगनाथ रणपिसे यांच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला करून एक शेळी ठार केली तर एक गंभीर जखमी केली. तब्बल दहा फूट लोखंडी कंपाऊंड असून देखील हा हल्ला झाल्याने रणपिसे कुटुंबीय आश्चर्य व्यक्त करत आहेत. या हल्ल्यात रणपिसे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.


ही घटना समजताच धामणी वनक्षेत्राच्या अधिकारी सौ.सोनाल भालेराव यांना संपर्क केला असता त्यांनी त्वरित वन विभागाचे शिपाई दिलीप वाघ यांना घटनास्थळी पाठवून त्यांनी पंचनामा केला असून रणपिसे कुटुंबियांना मदत मिळण्यासाठी सहकार्य करू असे वाघ यांनी सांगितले.

तसेच घटनेची माहिती समजताच आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष व शिरदाळे मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने सर्वोत्तपरी मदत केली जाईल असे देखील सांगितले. तसेच वनविभागाने शिरदाळे गाव बिबट प्रवण क्षेत्रात घ्यावे आणि परिसरात पिंजरा लावावा अशी देखील मागणी यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने मयुर सरडे यांनी केली.


या अगोदर देखील बऱ्याचदा बिबट्या नागरिकांना दिसला असून दिवसा देखील बिबट्याचा वावर असतो त्यामुळे जनावरांकडे जाणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून पंधरा दिवसांपूर्वी देखील बाबाजी चौधरी आणि बाळासाहेब रणपिसे यांच्या गोठ्यावर बिबट्या आला होता परंतु त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ जागे झाल्याने तो हल्ला फसला होता. तरी देखील प्रत्येक ग्रामस्थांनी आपली जनावरे बंदीस्थ ठिकाणी बांधावीत तसेच जेवढी काळजी घेता येईल तेव्हडी घ्यावी असे आवाहन सरपंच जयश्री संतोष तांबे व उपसरपंच बिपीन चौधरी यांनी केले आहे. यावेळी रंगनाथ रणपिसे,राजू चौधरी,बाळासाहेब रणपिसे,संदीप मिंडे,अनिकेत चौधरी,ओम रणपिसे,जया रणपिसे आणि रणपिसे कुटुंबीय उपस्थित होते.

गेल्या दोन,तीन वर्षांपासून बिबट्या असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते परंतु कुठे काही हल्ले नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात होते परंतु गेल्या वर्षभरात बिबट्याचा वावर वाढला असून हा एक बिबट्या नसून त्यांची संख्या जास्त आहे.शिवाय आता तर बिबट्याने हल्ले देखील सुरू केले आहेत त्यामुळे आमचे शिरदाळे गाव बिबट प्रवण क्षेत्रात समावेश करावा आणि परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने करत आहोत.
श्री.मयुर संभाजी सरडे
(मा.उपसरपंच शिरदाळे)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.