सामाजिक

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचा बेल्ह्यात ‘आविष्कार’; पुणे-मुंबई विभागीय फेरीसाठी समर्थ इन्स्टिट्यूट सज्ज !!

1010877760

पंचनामा प्रतिनिधी – बेल्हे (ता. जुन्नर) : राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशीलतेला आणि संशोधनवृत्तीला चालना देणाऱ्या आविष्कार २०२६च्या पुणे-मुंबई विभागीय फेरीच्या आयोजनाची जबाबदारी समर्थ शैक्षणिक संकुल संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ ऑक्टोबर २०२६ रोजी बेल्हे येथे ही विभागीय फेरी पार पडणार आहे.

या विभागीय फेरीत पुणे, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील ५४ महाविद्यालये सहभागी होणार आहेत. विविध शाखांतील विद्यार्थी संशोधन प्रकल्प, नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच सामाजिक व दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित अभिनव उपाय तज्ज्ञ परीक्षकांसमोर सादर करतील. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनाची मांडणी करण्याबरोबरच तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मौल्यवान अभिप्राय मिळणार आहे.

राज्यातील विविध विभागांत विभागीय फेऱ्यांचे आयोजन
आविष्कार २०२६च्या विभागीय फेऱ्यांचे राज्यभर नियोजन करण्यात आले आहे. १७ ऑक्टोबर रोजी विदर्भ, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक-जळगाव विभागांत, तर २४ ऑक्टोबर रोजी सोलापूर, नांदेड, पुणे-मुंबई आणि सातारा-कोल्हापूर विभागांत विभागीय फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी पुणे-मुंबई विभागाची जबाबदारी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीकडे देण्यात आली आहे.

मार्गदर्शन कार्यशाळेतून आयोजनाला दिशा

विभागीय फेरीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी नाशिक येथे मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आविष्कार विद्यापीठ प्रतिनिधी डॉ. संजय खोब्रागडे, डॉ. संगीता मेटकर, प्रा. अनिकेत जंगम आणि प्रा. तेजस महागावकर यांनी स्पर्धेचे स्वरूप, संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण, मूल्यांकनाचे निकष तसेच आयोजनातील महत्त्वाच्या बाबींविषयी मार्गदर्शन केले.
मागील यशस्वी आयोजनाचा अनुभव ठरणार उपयुक्त
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला यापूर्वी शैक्षणिक, संशोधन आणि विद्यार्थी विकासाच्या विविध उपक्रमांच्या आयोजनाचा अनुभव असून, २०२५ मध्ये झोनल स्तरावरील आविष्कार स्पर्धेचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाने केले होते. सहभागी विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन, प्रकल्प सादरीकरण, परीक्षक समन्वय आणि तांत्रिक व प्रशासकीय नियोजनाचा हा अनुभव यंदाच्या मोठ्या विभागीय फेरीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके यांनी सांगितले, “मागील वर्षीच्या आयोजनातून मिळालेल्या अनुभवामुळे यंदाच्या विभागीय फेरीचे नियोजन अधिक सक्षमपणे करता येत आहे. सहा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन कल्पना प्रभावीपणे मांडता याव्यात, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे आणि संशोधनासाठी पोषक वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी महाविद्यालयाची यंत्रणा सज्ज आहे.”
विविध समित्यांकडून तयारीला वेग
आयोजनाच्या तयारीसाठी समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर मा. राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले, आणि समर्थ इन्स्टिट्यूटचे विभागप्रमुख डॉ. सचिन दातखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या कार्यरत आहेत. विद्यार्थी नोंदणी, प्रकल्प सादरीकरण, परीक्षक समन्वय, तांत्रिक सुविधा, पायाभूत व्यवस्था आणि कार्यक्रम व्यवस्थापनाच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.

विभागीय फेरीच्या समन्वयाची जबाबदारी प्रा. शुभम गडगे, डॉ. मंगेश होले यांच्याकडे पुरुष समन्वयक, तर डॉ. शितल गायकवाड यांच्याकडे महिला समन्वयक म्हणून सोपविण्यात आली आहे. या समन्वयकांनी २०२५ मधील झोनल स्तरावरील आविष्कार स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या अनुभवाचा उपयोग यंदाच्या विभागीय फेरीच्या नियोजनात केला जात आहे. विद्यापीठाच्या वतीने डॉ. संजय खोब्रागडे, डॉ. संगीता मेटकर, प्रा. अनिकेत जंगम आणि प्रा. तेजस महागावकर हे मार्गदर्शन व समन्वय करणार आहेत.

संस्थेचे अध्यक्ष मा. वसंतराव शेळके, उपाध्यक्ष मा. माऊली शेठ शेळके, सचिव मा. विवेक शेळके आणि विश्वस्त मा. वल्लभ शेळके यांनी आयोजनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या असून, विद्यार्थ्यांच्या संशोधन व नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या वतीने आवश्यक सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010806600

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाली स्वच्छता मोहीम!!

Chief Editor

पीएमआरडीए’ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश…!!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंजनगर येथे उत्साहात संपन्न झाला बालचमुचा दिंडी सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment