
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात आज दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र या पावसाने बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ऊस, मका, बाजरी ही पिके जमीनदोस्त झाली असून कोबी,फ्लॉवर,बीट या पिकांच्या शेतात पाणी साचून राहिल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

याशिवाय पूर्व भागात बहुतांशी ठिकाणी लोकांची पत्रा शेड, गोठ्यावरील पत्रे,जाहिरातीचे बॅनर उडून गेले आहेत तर काही ठिकाणी या वादळी पावसात पशुधन देखील मृत्युमुखी पडले आहेत.

थोडक्यात या पावसाने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात कही खुशी कही गम असे वातावरण आहे.
