
पंचनामा विशेष – आंबेगावच्या पूर्व भागातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेले धामणी हे गाव, खरतर दुष्काळ हा कायमच पाचवीला पुजलेला !! परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथील परिस्थिती बदलत आहे.धामणी गावातील शेतकऱ्यांनी समूहाने एकत्र येऊन उपसाजलसिंचन योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक खर्चातून शेती बारमाही बागायत करण्याचा निर्णय घेतला आणि आता येथील परिस्थिती हळूहळू बदलत आहे.

धामणी गावातील शेतकरी आपल्या माथ्यावर दुष्काळी म्हणून असलेला शिक्का पुसण्यात यशस्वी होत आहे.धामणी येथील युवा शेतकरी श्री. शांतारामशेठ जाधव यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन या वर्षी पहिल्यांदाच आपल्या शेतामध्ये कलिंगड, काकडी ही पिके घेण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा प्रयोग यशस्वी होताना दिसत असून भरघोस अस उत्पन्न मिळणार आहे.

सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून बाजारामध्ये कलिंगड आणि काकडी या दोन्ही फळांना चांगली मागणी असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे त्याचप्रमाणे आपण घेतलेल्या कष्टाच चीज होताना दिसत आहे.
✍️ संदिप ( विशाल) तांबे पाटील..

