सामाजिक

डिंभे धरणाचा उजवा कालवा झाडाझुडपांच्या गर्दीत हरवला; देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी !!

1010836803
1010836803

पंचनामा प्रतिनिधी – प्रतिनिधी आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाचा उजवा कालवा सध्या अनेक ठिकाणी वाढलेल्या झाडे, झुडपे व गवताच्या गर्दीमुळे अक्षरशः हरवून गेल्याचे चित्र दिसत आहे. शेतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या कालव्याच्या देखभाल व स्वच्छतेकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

डिंभे धरणाचा उजवा कालवा हा केवळ आंबेगाव तालुक्यासाठीच नव्हे, तर शिरूर तसेच पुढील पारनेर व नगर जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. या कालव्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र अवलंबून असून ऊस, कांदा, भाजीपाला, फळबागा तसेच विविध हंगामी पिकांना या पाण्याचा मोठा आधार मिळतो. डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे अनेक भागातील शेती बागायती होण्यास मदत झाली आहे.

1010836801

मात्र, कालव्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडेझुडपे, गवत व रानटी वनस्पती यामुळे अनेक ठिकाणी कालव्याचे अस्तित्वच झाकोळले गेले आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कालव्याच्या पात्रात झुकल्या असून पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. भविष्यात पाणी सोडण्यात आल्यानंतर प्रवाह सुरळीत राहण्यासाठी कालव्याची तातडीने स्वच्छता व देखभाल करणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

1010836826

डिंभे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्राचा विचार करता उजव्या कालव्याची नियमित साफसफाई, झाडेझुडपे हटविणे, गाळ काढणे व आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कालवा हा शेतीच्या अर्थकारणाचा कणा असून त्याच्या दुर्लक्षामुळे भविष्यात पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे जलसंपदा विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची पाहणी करावी व झाडाझुडपांच्या विळख्यात हरवलेल्या कालव्याला पुन्हा मोकळा श्वास द्यावा, अशी मागणी आंबेगाव, शिरूर, पारनेर व नगर परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

“शेतीला जीवन देणारा कालवा झाडांच्या गर्दीत हरवू नये; त्याची वेळेत देखभाल झाली तरच भविष्यातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम राहील,” अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997
1010760540

Related posts

वारकऱ्यांचा ‘चरण सेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम- रामेश्वर नाईक

Chief Editor

माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी !!

Chief Editor

भक्ती विठ्ठलाची… सेवा आरोग्याची! लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी सज्ज आरोग्य यंत्रणा !! १९२ वैद्यकीय पथके, १७६ रुग्णवाहिका, ४,५०० औषध किट,निवारा केंद्रे, हिरकणी कक्ष आणि शुद्ध पाणी व्यवस्थेसह सर्वसमावेशक आरोग्य नियोजन !!

Chief Editor

Leave a Comment