Uncategorized

राज्यातील बहुतांशी भागात ८ जुलै पासून पाऊस घेणार ब्रेक !

1010095329

पंचनामा प्रतिनिधी – जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग.
8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. ⁠राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

1009850407

Related posts

निस्सीम देशभक्त, भारतरत्न, कवी मनाचे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व : अटलजी

Chief Editor

भारत प्रेरणा नॅशनल अवॉर्ड २०२५-२६ गोव्यात संपन्न होणार !!

Chief Editor

लोणी (धामणी ) गावातील विकासकामांचे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ समितीकडून कौतुक; गुणांकन प्रक्रिया संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment