सामाजिक

समर्थ शैक्षणिक संकुलात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी !!

img 20260411 wa0565


समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकारात्मक विचारसरणी आणि शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्गार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी काढले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, समर्थ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्‍मण घोलप,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,पॉलिटेक्निक चे प्रा.अनिल कपिले,लॉ कॉलेज चे प्राचार्य डॉ.सुनील कवडे,प्रा.शिवाजी कुमकर,डॉ. शरद पारखे,प्रशासकीय अधिकारी,प्रा.प्रदीप गाडेकर,रासेयो अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.भूषण दिघे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश बोरचटे,प्रा.निलेश नागरे,सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा फुले बद्दल माहिती देताना प्रा. राजीव सावंत म्हणाले की,महात्मा फुले हे मराठी लेखक,विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली.शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती.’शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.तसेच मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली.स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये‘महात्मा’ही उपाधी दिली.त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.अशा या थोर समाजसेवकांच्या प्रति आपण सर्वजण कृतज्ञ राहून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊयात आणि आपले इप्सित शैक्षणिक कार्य अखंडितपणे समाजामध्ये निर्विवाद पोहचवूया असे आवाहन डॉ. उत्तम शेलार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश बोरचटे यांनी तर आभार प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी मानले.

img 20260411 wa0565
fb img 1774661449199

Related posts

धामणी (लोणी) येथे ब्रिटायनिया इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!

Chief Editor

श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ”व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन !!

Chief Editor

निधन वार्ता – इंदूरी गावचे मा. सरपंच किसनराव नागुजी देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन

Chief Editor

Leave a Comment