
पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या मौजे जवळे येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने लोकसहभाग,श्रमदानातून पानंद रस्ता नवीन करणे, तसेच दुरुस्ती करणे ही कामे करण्यात येत असून यामध्ये गावातील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.

ग्रामस्थांच्या माध्यमातून रस्त्यावरती मुरम टाकून खड्डे बुजवण्यात आले. समृद्ध ग्राम अभियान राबवण्यात येत आहे असे आदर्श सरपंच सौ. वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी सांगितले.

यामध्ये संदीप वायाळ, रेवनाथ भुजबळ,मुकुंद भोर, रमेश भुजबळ, अशोक शिंदे, गणेश शिंदे, सौरभ शिंदे, बाळासाहेब अभंग, वसंत अभंग, हरिभाऊ अभंग ,नवनाथ शिंदे, बबन शिंदे, अविनाश वाळुंज महेश लोखंडे ,चिंधू साबळे या ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.


