आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचे बांध फुटले,माती गेली वाहून,विहिरीही गाडल्या गेल्या!!

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान!!

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फुटून माती वाहून गेले आहे. तर काही विहिरी गाडल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील तलाव फुटला आहे. त्यामुळे शासनाने ताबडतोब पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी. त्याचप्रमाणे तलाव दुरुस्त करावा अशी मागणी सरपंच अशोक करंडे यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पु्र्व भागातील काठापूर बुद्रुक या ठिकाणी काल साडेतीन ते साडेसहा या दुपारच्या वेळेस झालेल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाने गावातील शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. तर ओड्या काढची शेतजमीनही खरवडून गेली आहे. मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे ओढे तुडुंब भरून वाहत होते .परिणामी ओढ्यावरील असलेले अनेक छोटे बंधारे फुटले आहेत. काठापूर बुद्रुक येथील तलाव फुटला आहे. त्यामुळे सगळे पाणी वाहून गेले आहे. त्याची दुरुस्ती ताबडतोब शासनाने करावी अशी मागणी होत आहे. गावातील रस्ते ही अनेक ठिकाणी तुटले आहेत. वाहून गेले आहेत .त्यामुळे या ठिकाणी ताबडतोब दुरुस्ती होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फुटले आहेत.शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेती पिकांबरोबरच झालेल्या नुकसानीचे ही पंचमी करून नुकसान भरपाई मिळणे अशी मागणी विशाल करंडे आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.