आरोग्य व शिक्षण

अरे देवा!!वाळूंजनगर,लोणी,खडकवाडी परीसरात गारांसह अवकाळी पाऊस बरसला!! कांद्यासह नगदी पिकांचे मोठे नुकसान!!

वाळूंजनगर,लोणी, खडकवाडी परीसरात गारांसह अवकाळी पाऊस बरसला!! कांद्यासह नगदी पिकांचे मोठे नुकसान!!

आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील वाळुंजनगर, लोणी, खडकवाडी परिसरात आज गारांसह अवकाळी पाऊस पडल्याने कांद्यासह काढणीला आलेला गहू, मका,टोमॅटो,वांगी, दुधी भोपळा आदी नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कांदा पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले असताना अवकाळी पावसाने बळीराजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

अवकाळी पावसाने आणि गारा पडल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे ते कांदा पिकाचे!! या परीसरात कांदा पीक काढणी जोरात सुरू आहे. कांद्याला भाव कमी आल्याने या शिवाय बदलते हवामान, वाढलेला भांडवली खर्च यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान सोसायचे तरी कसे? या विवंचनेत शेतकरी अडकला असल्याचे उद्योजक जयेश वाळुंज यांनी सांगितले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.