सामाजिक

स्वातंत्र्यदिनी असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन !!

img 20260813 wa0566

पंचनामा प्रतिनिधी – उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार- प्रसिद्धीसाठी राज्य स्तरावरुन विविध उपक्रम राबविले जात असून त्याअंतर्गत येत्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक शाळेत असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.

माझे कुटूंब, गावाला १ मे २०२७ पर्यंत साक्षर करेल, मी माझ्या परिसरातील एकही व्यक्ती असाक्षर राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करेन. मी माझ्या कुटूंबातील सदस्य, मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी मदत करेन. मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. सर्व असाक्षर व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी १०० टक्के योगदान देऊन माझा महाराष्ट्र, साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मी कटीबद्ध आहे, अशी शपथ प्रत्येक शाळेत देण्यात यावी, असे श्री. कारेकर यांनी कळविले आहे.

1010457105

Related posts

समर्थ फार्मसी महाविद्यालयांचे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश !!

Chief Editor

धामणीच्या जिल्हा परिषद शाळेत अनोखा प्रवेशोत्सव;उपक्रमांच्या गर्दीत शैक्षणिक गुणवत्ता राखण्याचे शाळांपुढे आव्हान – ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव

Chief Editor

आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीस समर्पित संत निरंकारी मिशनचा घोडेगाव सह आळेफाटा, मंचर, जुन्नर, नारायणगाव मध्ये योग दिन उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment