
पंचनामा प्रतिनिधी – जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील विकास सोसायटीने ४९५ सभासदांना पुणे जिल्हा बँकेमार्फत खरीप हंगामासाठी चार कोटी बारा लाख पन्नास हजार पाचशे रुपयांची वाटप केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन खंडू भोजने सचिव नवनाथ मंचरे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे परिपत्रक अद्याप विकास सोसायट्यांना न मिळाल्याने सभासद, कर्जदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यामुळे संस्थेची वसुलीच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे परिपत्रक लवकर जाहीर करावे अशी मागणी संस्थेचे चेअरमन खंडू भोजने व्हा.चेअरमन बाळासाहेब लबडे यांनी केली आहे.

मा. मंत्री आमदार दिलीप वळसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड, विकास अधिकारी के.आर. वाळुंज यांच्या प्रयत्नांतून सभासदांना खरीप हंगामात जिल्हा बँके मार्फत वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे आजी माजी संचालक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
