
पंचनामा प्रतिनिधी – उप वनसंरक्षक,जून्नर वनविभाग २१ मार्च २०२६ हा दिवस वन-अग्नीमुक्त म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (दत्तात्रयनगर) या ठिकाणी साजरा करण्यात आला.तसेच अग्निमुक्त शपथविधी चे वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
वने आपले पाणी, माती, हवामान , वन्यजीव आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे रक्षण करतात. निसर्गाने अनेक वर्षे मेहनत करुन जे निर्माण केले आहे.ते वणवा काही तासांत नष्ट करु शकतो. जंगले आपली खरी संपत्ती आहेत. ती आपल्याला शुद्ध हवा,मुबलक पाणी, उपजीविकेची साधने आणि वन्यजीवना आश्रय देतात.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे,सेक्रेटरी रामनाथ हिंगे, स्टोअर किपर अनिल बोंबले,ऊस विकास अधिकारी दिनकर आदक, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे,वाहन प्रमुख किरण शिंदे, पारगाव चे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे,वनविभागाचे धामणी बीट वनपाल निलम चव्हाण,वनरक्षक लाखणगाव पुजा कांबळे,वनरक्षक लोणी योगेश निघोट, सुनील कालेकर,शांताराम जाधव,अजित चिखले,नारायण टेमकर,नामदेव रिठे,सुनिल टेमकर,अनिल वळसे पाटील,बाळशिराम शिंदे,दिपक वळसे पाटील,रोहिदास भागवत,अशोक जाधव,भरत गव्हाणे,स्वप्नील पवार,नितीन जाधव,किरण पोखरकर तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



