विजेच्या तारांमध्ये शॉट सर्किट झाल्याने काठापूर बुद्रुक येथील शेतकऱ्याचा ऊस पडला आगीच्या भक्षस्थानी!!
विजेच्या तारांमध्ये शॉट सर्किट झाल्याने काठापूर बुद्रुक येथील शेतकऱ्याचा ऊस पडला आगीच्या भक्षस्थानी!!
काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव येथे विजेच्या तारांमधे शॉर्ट सर्किट झाल्याने सुभाष संपत जाधव या शेतकऱ्याचा 36 गुंठे ऊस जळाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सध्या साखर कारखाने सुरू नसल्याने या शेतकऱ्यांचा ऊस तोडला जाणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. प्रशासनाने यावर योग्य ती दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी जाधव यांनी केली आहे.
काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव या ठिकाणी पांडुरंग वस्ती येथे गट नंबर 419 यामध्ये शेतकरी सुभाष संपत जाधव यांनी एक वर्षापूर्वी आडसाली उसाची लागवड केली होती.या उसाच्या शेताच्या वरून विजेच्या तारा जात होत्या या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे .काठापूर बुद्रुक या ठिकाणी एमएसईबी बोर्ड आहे.त्यातून गावातील विद्युत मोटारीरीना विज पुरवठा केला जातो. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब,विजेच्या तारा पसरलेल्या आहेत.अनेकवेळा गावातील शेतकऱ्यांचा ऊस यामुळे जळत असतो. शेतकरी सुभाष संपत जाधव यांचा ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
प्रशासनाने दखल घेऊन या उसाचा पंचनामा करून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आले आहे.