आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यातील शेतकरी पाणी प्रश्नावर आक्रमक. मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरूच !!

जुन्नर, आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यातील शेतकरी पाणी प्रश्नावर आक्रमक. मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरूच !!

खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी व डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव दोन दिवसांपासून उपोषण आंदोलन करत आहेत.

आज ह्या सर्व शेतकरी बांधवांची शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी आझाद मैदान, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांच्या तीव्र प्रतिक्रिया जाणून घेतल्या व पाणी प्रश्न तातडीने सुटावा म्हणून शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.