सामाजिक

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

img 20260407 wa0387

पंचनामा प्रतिनिधी – अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडचा घास हिराऊन घेतला आहे.लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील शेतकरी विश्वनाथ रोडे यांची तीन एकरांवरील कलिंगडाची बाग अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. काढणीला आलेली फळे सडल्याने तसेच वेली जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ही बाग नुकतीच तोडणीसाठी तयार झाली होती; मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. या घटनेत विश्वनाथ रोडे यांचे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारभाव घसरले होते. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला असून हतबल झाला आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. डोळ्यादेखत तयार झालेला शेतीमाल अस्मानी संकटामुळे नष्ट झाला असून कष्टाने फुलवलेल्या पिकांची नासधूस झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.

दरम्यान, लाखणगाव येथीलच शेतकरी शिवाजी रोडे यांनी एक एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती. पपई तोडणीला आली होती त्यांच्या पिकालाही अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा फटका बसून पपईची बाग उद्ध्वस्त झाली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने पंचनामे करून अधिकाधिक आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.

fb img 1774661444136

Related posts

रील फॉर सॉईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत सहभाग घ्यावा- चेतन कलशेट्टी ; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील पुलावर अपघाताचा धोका;घोड नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक सूचना फलक बसवा – मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांची मागणी!!

Chief Editor

संत निरंकारी मिशन-राजेवाडी शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३७४ जणांनी केले मानवतेप्रती रक्तदान…

Chief Editor

Leave a Comment