आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम अँड ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा अमृतसमारंभ उत्साहात संपन्न!!
आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम अँड ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा अमृतसमारंभ उत्साहात संपन्न!!
शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात परमपूज्य सद्गुरु आत्मामालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने आत्मामालीक ध्यानपिठाचे सर्व वंदनीय संतपरिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष , उपाध्यक्ष,सरचिटणीस समस्त विश्वस्त मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समिती शाखा – अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम अँड ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छारुपी अमृतसमारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यात सर्व विद्यार्थी सायन्स अभ्यासक्रमात शिक्षण घेत होते.
या समारंभ कार्यक्रम प्रसंगी आत्मा मालिक ध्यानपिठाच्या संत भारतमाता, कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब, स्थानिक विश्वस्त अनंत गायकवाड,प्रवीण मोरे , संकुलाचे शैक्षणिक व्यवस्थापक तथा प्राचार्य डॉ.डी .डी. शिंदे सर, सहाय्यक व्यवस्थापक उल्हास पाटील,प्राचार्य पंकज बडगुजर सर व उपप्राचार्य सारंगधर बावस्कर सर,वसतिगृह व्यवस्थापक श्री. ब्राह्मणे सर, ट्रस्ट विभागाचे राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले.यावेळी समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात आपल्या मनोगतातून महाविद्यालय आठवणींना उजाळा दिला.
यावेळी विद्यार्थ्यांना संकुलाच्या वतीने भेटवस्तू कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांच्या हस्ते देण्यात आल्या.
या प्रसंगी संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी महविद्यालयीन जीवन नंतरच होणार बद्दल आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाला अध्यत्मिकतेची जोड आयुष्यभरासाठी मोलाची ठरते.यामुळे अध्यात्माचे कास धरावी.यावेळी राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक गणेश हंबिर, तृतीय क्रमांक रोशन धापशी व उत्तेजनार्थ पारितोषिक सारिका धोंडी यांना मिळाल्याबद्दल यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहित गवळी यांनी कांस्यपदक विजेती ठरल्यामुळे त्याबद्दल अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद परमार व आभार प्रदर्शन अभय शिरोसे यांनी केले.
या कार्यक्रमाचा समरोप संगीत शिक्षक सुयोग खंडागळे सर व लक्ष्मण साळुंखे सर यांच्या संगीत भजन याद्वारे झाला.
या निरोप समारंभाला विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होता.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकॅडमी कॉर्डिनेटर सोनी पाशा , सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.
या वृत्ताबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब, विश्वस्त तथा कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब तसेच समस्त विश्वस्त मंडळ यांनी इयत्ता बारावी विद्यार्थ्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.