
पंचनामा प्रतिनिधी – जारकरवाडी (ता.आंबेगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.

तनिष्का किरण लबडे (२६२ मार्क, जिल्ह्यात सहावी), सुशांत किरण लबडे (२४६ मार्क, जिल्ह्यात चौदावा ), पार्श्व संदिप लोले (२४० मार्क, जिल्ह्यात सतरावा)

या विद्यार्थ्यांना अशोक किर्वे, अब्दुलरहिमान इनामदार व इतर सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले अशी माहिती मुख्याध्यापक शिवाजी चासकर यांनी दिली.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे गटशिक्षण अधिकारी,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य,सरपंच,उपसरपंच व सर्वसदस्य व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

