
पंचनामा प्रतिनिधी – ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी गावाच्या आदर्श सरपंच;प्रशासक सौ.वृषाली उत्तम शिंदे पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन अभिवादन करण्यात आले. या वेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेले संदेश यांना उजाळा दिला. शिक्षणाचे महत्व, समानतेचा हक्क, संघटन व एकता, लोकशाही आणि संविधान, स्त्री -पुरुष समानता महिलांना समान हक्क मिळावे यासाठी प्रयत्न केले असे सरपंच यांनी सांगितले.

त्यांच्या समवेत अंगणवाडी सेविका शालन सोनवणे, संध्या वाळुंज, पूजा शिंदे, सुनीता तांबे, प्रमिला खालकर, वैशाली वायकर ग्रामपंचायत अधीकारी शिला साबळे, अशोक लोखंडे कर्मचारी,भूपेंद्र वाळुंज ग्राम रोजगार सेवक,ग्रामस्थ उपस्थित होते.


