आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

दिंडीत कंटेनर घुसल्यामुळे चार वारकरी ठार ; नऊ वारकरी गंभीर जखमी

दिंडीत कंटेनर घुसल्यामुळे चार वारकरी ठार ; नऊ वारकरी गंभीर जखमी

कार्तिकी एकादशीनिमित्त शिर्डी येथुन आळंदीला निघालेल्या दिंडीत भरघाव कंटेनर घुसल्याने, झालेल्या भीषण अपघातात ४ वारकरी जागीच ठार झाले. ९ वारकरी गंभीर जखमी झाले असून ही घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगावजवळ एकोणीस मैल या ठिकाणी रविवार दिनांक ३ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. बाळासाहेब गवळी, बबन थोरे, भाऊसाहेब जपे व ताराबाई गमे अशी अपघातात ठार झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. जखमींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिर्डी येथील साईबाबांच्या पावन भूमीतील काशीकानंद महाराज यांच्या वारकऱ्यांची दिंडी संगमनेरमार्गे आळंदीकडे पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गान जात होती. दिंडी रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घारगावजवळ एकोणीस मैल येथे आली. त्यावेळी भरधाव कंटेनर दिंडीमध्ये घुसला. कंटेनरने चिरडल्यामुळे भीषण अपघातात ४ वारकरी जागीच ठार झाले. तसेच ९ जण जखमी झाले आहेत.
Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.