नेतृत्व गुणांची प्रयोगशाळा म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना-दिपकशेठ औटी

नेतृत्व गुणांची प्रयोगशाळा म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना:दिपकशेठ औटी!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बेल्हे व समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे (बांगरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर राजुरी येथे १ फेब्रुवारी २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे.शिबिराचे उदघाटन राजुरी गावचे ग्रामनेते व पंचायत समिती चे माजी सभापती दिपक शेठ औटी, सरपंच सौ.प्रिया ताई हाडवळे यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,तंटा मुक्ती चे माजी अध्यक्ष संदिप औटी,बाळासाहेब औटी,ग्रामपंचायत सदस्य शाकीर भाई चौगुले,रंगनाथ पाटील औटी,निलेश हाडवळे,तलाठी भोसले भाऊसाहेब,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.बसवराज हातपक्की,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.विपुल नवले,प्रा.तेजश्री गुंजाळ,प्रा.दिनेश जाधव,प्रा.गौरी भोर,प्रा.दिपक साबळे,प्रा.बिपीन गांधी,प्रा.सचिन भालेकर,प्रा.गणेश बोरचटे,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,किरण वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिपक शेठ औटी म्हणाले की,हे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर गावच्या सर्वांगीण विकासासाठी फार महत्वाचे व फलदायी असून समाजाभिमुखता जोपासण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.राजुरी गावाची वैचारिक बैठक तीन पिढ्यांनी घालून दिलेली आहे.
नेतृत्व गुणांची प्रयोगशाळा म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना असून त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.
ऐतिहासिक वारसा,विविध संस्थांचे कार्य,शाळा,विद्यालये याबाबतची विस्तृत माहिती यावेळी त्यांनी शिबिरार्थींना दिली.शिबिरामार्फत होणाऱ्या विधायक उपक्रमांसाठी गाव सर्वतोपरी मदत करेल असे सरपंच प्रियाताई हाडवळे म्हणाल्या.
आझादी का अमृत महोत्सव निमित्त शिबिर कालावधीत घेण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती यावेळी वल्लभ शेळके सरांनी दिली.त्यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास,स्त्री भ्रूण हत्या,रस्ता सुरक्षा,जलसंवर्धन,पर्यावरण संरक्षण,महिला सक्षमीकरण,वनराई बंधारा,अंधश्रद्धानिर्मूलन पर जनजागृती कार्यक्रम,योगासने,स्त्री-पुरुष समानता,व्यसनमुक्त भारत,माझी वसुंधरा अभियान,पोस्टर सादरीकरण,स्वच्छता अभियान,वृक्षारोपण,स्थानिक इतिहास लेखन,शालेय स्पर्धा अशा अनेकविध उपक्रमांचा समावेश करण्यात आल्याचे वल्लभ शेळके यांनी सांगितले.
स्वावलंबी शिक्षण हाच खरा या शिबिराचा हेतू आहे.या शिबिरामध्ये विद्यार्थी गावची स्वच्छता,निगा आणि सुधारणेच्या दृष्टीने कटिबद्ध तर राहतील.गाव स्वच्छतेबरोबरच मनामनातील विकार,दुर्गुण,वाईट विचार,आणि सवयीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून मन निरोगी आणि साफ करण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचे प्रा.प्रदीप गाडेकर म्हणाले.
या शिबिरामध्ये एकूण २५० विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झालेले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा.विपुल नवले यांनी मानले.