आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या तुकानाना चौक, चांडोली खुर्द ते पिंपळगाव(खडकी) रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ७७ लक्ष रूपये निधीतून प्रगतीपथावर !!

आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या तुकानाना चौक, चांडोली खुर्द ते पिंपळगाव(खडकी) रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ७७ लक्ष रूपये निधीतून प्रगतीपथावर !!
———————————————————————
शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावासाठी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व पुणे जिल्ह्याचे मा.पालकमंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रूपये निधी मंजुर केला होता.
सुरवातीच्या टप्प्यात १२.३८ कोटी रुपये निधीतून जल जीवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला होता. ह्या योजनेचे काम प्रगतीपथावर असून उर्वरीत विकासकामे देखील अंतिम टप्प्यात आहेत.
आज युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपभियंता ज्ञानेश्वर उभे यांनी तुकानाना चौक, चांडोली खुर्द ते पिंपळगाव(खडकी) या रस्त्याच्या सुरु असलेल्या डांबरीकरण कामाची पाहणी केली व संबंधित यंत्रणेला काही आवश्यक सूचना देखील केल्या. वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याचे काम सुरु असताना वाहतूक देखील नियमित सुरु असते त्यामुळे डांबरीकरणाचे काम गतीने सुरू ठेवण्यासाठी यंत्रणेला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.
यावेळी बोलताना सचिन बांगर म्हणाले की, माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातुन पिंपळगाव(खडकी) गावाला जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना, जिल्हा नियोजन समिती तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गावातील महत्त्वाचे रस्ते, स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, व्यायामशाळा, प्राथमिक शाळा वर्गखोल्या- सभागृह, अंगणवाडी ईमारती, दलित वस्ती सामाजिक सभागृह, महिला अस्मिता भवन इमारत इत्यादी विकासकामांना जवळपास २० कोटी रूपयांपेक्षा अधिकचा निधी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण असून ही सर्व विकासकामे अंतिम टप्प्यात असल्यामुळे विकासकामांच्या दर्जावर स्थानिक वस्तीतील ग्रामस्थांनी लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगुन आगामी काळात ग्रामस्थांनी विकासाच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन केले.
पिंपळगाव(खडकी) येथे सुरू असलेल्या विकासकामांमुळे गावची संपूर्ण आंबेगाव तालुक्यात चर्चा आहे. गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यांसह पाणीपुरवठा योजनेतून अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, घोडनदीपात्रात स्वतंत्र विहीर, जॅकवेल, पंपहाऊस, ३ ठिकाणी एकूण ५ लक्ष लिटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाक्या, ३२ किलोमिटर परिसरात पाण्याची पाइपलाइन द्वारे ५५ लिटर प्रति मानसी शुद्ध पाणी पुरवठा नागरिकांना केला जाणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.