मंचर आहुपे एस.टी.बस सेवा नियमीत व सुरळीत सुरू ठेवा,स्थानिक रहिवाशांची व प्रवाशांची मागणी!!


मंचर ते आहुपे या मार्गावर असणारी बस सेवा नियमीत व सुरळीत सुरू ठेवण्याची आग्रही मागणी स्थानिक रहिवासी व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.
आहुपे हे आहुपे खोऱ्यात शेवटच्या टोकाला वसलेले आदिवासी गाव आहे.मंचर ते आहुपे गाडी गेले आठ दिवस झाले हप्त्यातुन तीन ते चार वेळा रस्त्यामध्ये बंद पडत आहे. आजही दिडची गाडी आडिवरे गावात बंद पडली होती.मंचर डेपोला फोन केल्यानंतर गाडी उपलब्ध नाही किंवा फिटर उपलब्ध नाही असे सांगितले जाते.ज्यामुळे प्रवाशांची खुप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
आदिवासी भागात जुन्या बस पाठवुन दिल्या आहेत.ज्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झालेली आहे.त्यात बसायला व्यवस्थित शीट नाहीत अशी एस.टी.बसेसची अवस्था आहे.प्रशासनाने चांगल्या पद्धतीच्या बसेस एस. टी.परिवहन मंडळ मार्फत मंचर डेपोला उपलब्ध करून द्याव्यात अशी आदिवासी भागातील ग्रामस्थ यांची मागणी असल्याचे मा.सभापती संजय गवारी यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.तसेच याबाबत मा.गृहमंत्री /सहकारमंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील, मा.खा.म्हाडाचे सभापती शिवाजीराव (दादा ) आढळराव पाटील यांना निवेदन देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,आहुपेचे मा.सरपंच रमेश लोहकरे,संजय लांघी, अमोल अंकुश,विशाल करवंदे आणि आहुपे ग्रामस्थ यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.
