जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे अभिनव पद्धतीने संपन्न झाला प्रजासत्ताक दिन!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे अभिनव पद्धतीने संपन्न झाला प्रजासत्ताक दिन!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गावं म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावच्या ढोबळेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभिनव उपक्रम राबवत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत झेंडावंदन, विद्यार्थांची भाषणे शालेय संपन्न झाली. ध्वजारोहण सोसायटी चे मा.उपाध्यक्ष महादू चिमाजी लबडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्व महीला भगिनींनी व्यासपीठावर स्थान देण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ही शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सुरेखा भाऊसाहेब लबडे यांनी भूषवले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सेंद्रिय शेती, महिलांचे आरोग्य, आरोग्य विषयी त्यांच्या समस्या, प्रश्न या विषयावर परीसंवाद या वेळी पार पडला.
दैनंदिन जीवनात महिलांना अनेक शारीरिक आजारांना सामोरे जावे लागते. कामाच्या गडबडीत त्या स्वतःच्या शरीराकडे व शाररिक व्याधीकडे दुर्लक्ष करतात.ज्यामुळे भविष्यात त्यांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. जर वेळीच सावध होऊन या समस्या सुटल्या अथवा आजाराचे निदान झाले तर त्यावर उपाययोजना करणे शक्य होते. म्हणून महीलांनी न घाबरता उपचार घेण्यासाठी पूढे यावे तसेच आगामी काळात महिलांसाठी गावात ग्रामस्थांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात यावीत असा विचार ही सर्वानुमते मांडण्यात आला.
सध्याचे जीवन हे धकाधकीचे जीवन बनले आहे. धावपळीच्या युगात माणूस आपल्या आहाराकडे कानाडोळा करत फास्ट फूड च्या मागे लागला आहे. तसेच आहारात येणाऱ्या पालेभाज्या, फळे, धान्य ही संकरित स्वरूपाची आहेत. ज्याचा माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे किमान आपल्या कुटुंबासाठी तरी परसबागेचा वापर करून त्यात सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या,फळभाज्या तयार करण्यात याव्यात व त्याचाच वापर रोजच्या आहारात केला जावा यासाठी पुढील वर्षात किमान 25 ते 30 कुटुंबात तरी परसबाग तयार करायची शपथ यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतली.
सध्याचा तरुण व तरुणपिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी गेला आहे. ही तरुणांची पिढी व्यसनमुक्त करायची असेल तर गावात होणाऱ्या वराती थांबल्या पाहिजेत असा ही विचारही या वेळी मांडण्यात आला.तसेच घरात आणि लहान मुलांना मोबाईल पासुन दुर ठेवण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ही या प्रसंगी करण्यात आले.
या चर्चेत ह.भ.प.बाबुराव महाराज ढोबळे, मा. उपसरपंच बाळासाहेब ढोबळे, मा. उपसरपंच मनीषा ढोबळे, संचालक दादाभाऊ टाव्हरे, आहार तज्ञ अशोक पाचपुते, कानिफनाथ ढोबळे सर, तेजस्विनी अग्रोच्या ऋतुजा ढोबळे, नीलम डौंडकर, भिमाशंकर ढोबळे(पोस्टमन),अंगणवाडी सेविका ताराबाई पाचपुते, मा.मुख्याध्यापक निवृती पाचपुते(गुरूजी), नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष प्रदीप ढोबळे, उपअध्यक्ष अरुना टाव्हरे आदींनी सहभाग घेतला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय थोरात, सहशिक्षक वैजयंता थोरात, अंगणवाडी सेविका निर्मला पाचपुते, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष काळूराम टाव्हरे, कात्रज दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष ढोबळे, चेअरमन रायचांद ढोबळे, सर्व मुलांचे पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी कु.भूमी ढोबळे,कु.कादंबरी लबडे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. त्यांच्या पालकांच्या वतीने मुलांना गोड खाऊ चे वाटप करण्यात आले.